अण्णा हजारेंनी भ्रष्टाचाराच्या विरोधात जेव्हा सरकारविरोधात
आंदोलन छेडलं, तेव्हा भले-भले घाबरले. आता काहीतरी क्रांती वगैरे होणार म्हणून
सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे लागल्या.
यामुळं केवळ भ्रष्टाचारी, राजकारणी लोकच नव्हे तर चक्क एक चौथीचा विद्यार्थीपण घाबरला.
तो आपल्या वर्गमित्रांना म्हणाला, “अरे, कुणीतरी आवरा या अण्णांना. यांना नाही आवरलं तर आपल्या इतिहासाच्या पुस्तकात
अजून एक धडा येईल.”