एक पोरगा स्वत:ला खूप शहाणा समजत असायचा.
एके दिवशी मला भेटला.
आपली विद्वत्ता दाखवण्यासाठी मला म्हणाला, “जगामध्ये कांदा हे एकच फळ असं आहे, ज्यामुळे डोळ्यांत
पाणी येतं.”
मी म्हटलं, “ए येडया, असं काही नाही. नारळामुळे पण येऊ शकतं.”
शास्रज्ञ असल्यासारखा मला म्हणाला, “मग सिद्ध करून दाखव.”
मग मी तरी काय कमी आहे?
मी घेतला नारळ आणि हाणला त्याच्या टाळक्यात.
अन ते गावभर बोंबलत पळालं...