Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

19 December 2015

नाम है विजय दीनानाथ चौहान, हांय...


अमिताभ बच्चन आपल्या नुकत्याच घेतलेल्या नव्याकोर्‍या लक्झरी कार ओस्टिन मोर्टिन मधून जात होता.

अचानक अमिताभला कार चालविण्याची हुक्की आली.

त्याने ड्रायवरला मागे बसविले आणि स्वत: कार चालवण्याचा आनंद घेऊ लागला.

सिग्नल तोडल्याने एका ट्राफिक हवालदाराने गाडी अडवली.

आत वाकून बघतो तर अमिताभ !!!

हादरलाच तो हवालदार. त्याने आपल्या एसीपी साहेबांना हाक मारली.

हवालदार : सर, सिग्नल तोडला म्हणून मी ही गाडी अडवली. पण पावती फाडण्याची माझी हिम्मतच होत नाहीये. फार मोठी व्यक्ती बसलीय आत.

एसीपी : कोण राजा बसलाय?


हवालदार : सर, ते माहीत नाही. पण त्याने अमिताभ बच्चनला ड्रायवर ठेवलय.


Excuse me...


जर तुम्ही जिन्यात किंवा कुठेही उभे असाल जेणेकरून दुसर्‍यांना येण्या-जाण्यासाठी अडथळा निर्माण करत असाल तर,
एक गोष्ट लक्षात ठेवा.


जर कुणी तुम्हाला “Excuse me!असं कितीही अदबीने म्हणालं,

तरी त्याचा दूसरा अर्थ (त्या व्यक्तीच्या मनातला) हाही असतो की, सरक ए, बावळट कुठला.


10 November 2015

फायद्याचा सौदा


नवरा : काय गं, आजकाल मी दारू पितो, सिगारेट ओढतो तरी तू मला काहीच का बोलत नाहीस. आधी तर घर डोक्यावर घ्यायचीस.


बायको : कारण, काल ना इन्शुरेंसवाले आले होते. त्यांनी मला या सगळ्याचा काय फायदा आहे ते सांगितलं, म्हणून.


24 October 2015

स्मार्ट “गाय”…


एक पोरगा स्वत:ला खूप शहाणा समजत असायचा.

एके दिवशी मला भेटला.

आपली विद्वत्ता दाखवण्यासाठी मला म्हणाला, “जगामध्ये कांदा हे एकच फळ असं आहे, ज्यामुळे डोळ्यांत पाणी येतं.”

मी म्हटलं, “ए येडया, असं काही नाही. नारळामुळे पण येऊ शकतं.”

शास्रज्ञ असल्यासारखा मला म्हणाला, “मग सिद्ध करून दाखव.”

मग मी तरी काय कमी आहे?

मी घेतला नारळ आणि हाणला त्याच्या टाळक्यात.

अन ते गावभर बोंबलत पळालं...

 

असंय का?


इंजिंनियरिंगच्या वर्गात एक विद्यार्थी मोबाइलवर खेळत बसला होता.

वर्गात लक्ष नसल्याचं पाहून प्राध्यापक वैतागतात आणि त्याला एक प्रश्न विचारतात, “माणूस चंद्रावर गेला तर त्याचं वजन किती भरेल?”

१.     कमी होईल

२.     वाढेल

३.     काहीच फरक होणार नाही

खरंतर हे उत्तर कुणीही शाळकरी मुलगा पण देऊ शकतो. पण हे प्राध्यापक महाशय उगीच त्या बिचार्‍या पोराला काहीतरी विचारायचं म्हणून विचारत असतात.

तो भावी इंजिनियर हे ओळखतो आणि म्हणतो, “कमी होईल.”

प्राध्यापक : का?

विद्यार्थी : कारण, तिथे खायला काही मिळणार नाही म्हणून.

ही. ही. ही. ही......

 

रिक्षावाला


एकदा एक पुणेकर नागपूरला गेला.

तिथे एका रिक्षावाल्याला हात केला. रिक्षा थांबली.

पुणेकर : सीता-बर्डीला जाणार का?

रिक्षावाला : हो.

पुणेकर : किती घेणार?

रिक्षावाला : २०० रुपये.

पुणेकर : ५० देईन.

रिक्षावाला : अहो, ५० रुपयांत कोण नेतं? नाही जमणार.

पुणेकर : नेतो ना मी. तुम्ही मागे बसा.

 

17 October 2015

पाकिस्तानी सैनिक

एकदा एका पाकिस्तानी सैनिकाने आपल्या कमांडरला फोन केला.

सैनिक : सर, आत्ताच इथे एका बाईने आपल्या नवर्‍याला गोळी घालून ठार मारले.

कमांडर : का?

सैनिक : ती बाई फरशी साफ करत होती आणि तिचा नवरा त्या ओल्या फरशीवरून चालत दुसर्‍या खोलीत गेला म्हणून.

कमांडर : मग तुम्ही त्या बाईला अटक केली की नाही अजून?

सैनिक : नाही अजून, सर.

कमांडर : का?


सैनिक : अजून फरशी सुकलेली नाहीये.


एक खोज


पुरातत्व विभागाच्या लोकांना हजारो वर्षांपूर्वीचा एका बाईचा जबडा मिळाल्याची पक्की खबर आहे.

हा जबडा अजूनही चालू अवस्थेत असल्याने हा एखाद्या बाईचाच असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.


खरं टॅलेंट

खरं टॅलेंट तर त्या १० वी पास मुलाकडे असतं जो मेडिकल स्टोअरमध्ये काम करतो.

कारण, १० वी पास असूनही कुठल्याही डॉक्टरचं अक्षर तो ओळखू शकतो.

नाहीतर आपण,


इंजिनियरिंग करून पण आज लिहिलेलं काही दिवसांनी आपल्यालाच ओळखू येत नाही.



फेसबूकवर नाराज

फेसबूकने dislike करण्यासाठी नवीन बटन द्यायचं ठरवलंय.

पण

भारतीय लोक तरीही नाराज आहेत.

त्यांच्या मते,

फक्त dislike करून काय होणार?

त्यापेक्षा असं बटन द्या की,


ज्यावर क्लिक करताच कोर्टाची नोटिस पोस्ट टाकणार्‍याच्या थेट घरी पाठवली जाईल.


15 October 2015

काय सर, तुम्हीपण ना...


शिक्षक : बंड्या मला सांग, रात्री मच्छर चावले तर काय करायला पाहिजे?


बंड्या : काही नाही. खाजवून गप्प झोपायला पाहिजे. तुम्ही काय रजनीकांत नाही की त्याच्याकडून सॉरी म्हणवून घ्याल म्हणून.


12 October 2015

हे पोट्ट काय करून राह्यलं बे


मुख्यमंत्र्याच्या गावातलं एक पोरगं सरकारच्या नाराजगीमधे १०वी, १२वीच्या मार्कशीट वापस कराले चाललं होतं.

त एका पोट्ट्यानं मागून आवाज देल्ला अन म्हने,


अबे सम्मान वापस करून रायले, अपमान नाही.


कोल्हापुरी


लहान मुलगा खेळत खेळत कूलरजवळ गेला तर बाबा कसे रागावतात.

मुंबईतले बाबा : ए पिल्लू, दूर हो बघू नाहीतर शॉक लागेल बेटा.

पुण्यातले बाबा : बाळा कूलरजवळ जाऊ नको, शॉक लागेल.


कोल्हापुरातले बाबा : सरमागं, कूलर बंद पाडचील.


06 October 2015

काय जमाना आलाय...

पहिले दोघांची भांडणं झाली तर तिसरा सोडवायचा,

आणि आता,


तिसरा व्हिडिओ रेकॉर्ड करतो.


जरा ऐका

जे लोक आपल्या गाडीची पेट्रोल टाकी फुल्ल भरून स्वत:ला श्रीमंत समजत आहेत ना,

त्यांना एक सांगतो की,


मी आत्ताच कांदा-भजी खाललीत.


01 October 2015

१० वर्षांची कमाई

१० वर्षांत कोण किती कमावतं?

शिक्षक = २५ लाख

डॉक्टर = ५० लाख

अभियंता = ५० लाख

सरकारी अधिकारी = ७५ लाख

निर्मल बाबा = ५०० कोटी

रामदेवबाबा = ११,१७७ कोटी

सत्य साईबाबा = ४०,००० कोटी


“...म्हणूनच आपल्या पुढील करियरचा चांगला विचार करा मित्रहो.”


बिचारा “कर्म”चारी

एकदा एका कर्मचार्‍याला दहशतवादी पकडतात.

ते त्याला हाल हाल करून मारण्यापूर्वी त्याची शेवटची इच्छा विचारतात.

कर्मचारी : मी एक साधासुधा कर्मचारी आहे हो. मला माझ्या बॉसशी बोलायचं आहे.

दहशतवादी चकित होतात. पण तरी ते त्याला फोन लावून देतात.

तो बिच्चारा कर्मचारी फोन लाऊडस्पीकरवर टाकतो.

कर्मचारी : हॅलो बॉस, मला दहशतवाद्यांनी पकडलंय. ते आता मला हाल हाल करू मारणारेत.

दहशतवादी मोठमोठ्याने हसू लागतात.

बॉस : अरेरेपण उद्या ऑडिट आहे. शक्य असेल तर ये.

हे ऐकून,


दहशतवाद्यांना त्या कर्मचार्‍याची दया येते आणि ते त्याला चक्क सोडून देतात.

15 September 2015

संता

एकदा संता ऑफिसला जायला निघतो.

इमारतीतून खाली आल्यावर त्याच्या लक्षात येतं की तो रुमाल आणि मोबाइल घरातच विसरलाय.
तो बायकोला फोन लावतो आणि तिसर्‍या मजल्यावरून खाली टाकायला लावतो.

बायको : रुमाल आधी टाकू की मोबाइल?

संता : मोबाइल

बायको मोबाइल टाकते पण संताचा कॅच सुटतो आणि मोबाइल खाली पडून तुटतो.


संता बायकोला जोरात ओरडून म्हणतो, “थांब, थांब. रुमाल नको टाकूस खाली. मीच वर येतो न्यायला.”

09 September 2015

कंडक्टर आणि ड्रायवरमधला फरक


शिक्षिका : सांग बंड्या, कंडक्टर आणि ड्रायवरमध्ये फरक काय असतो?


बंड्या : कंडक्टर झोपला तर कुणाचंचं तिकीट फाडलं जाणार नाही, पण ड्रायवर झोपला तर सगळ्यांचंचं फाडलं जाईल.


03 September 2015

हिंदुस्तानी-पाकिस्तानी भाई भाई


एकदा सेनेचा एक जवान आपल्या अधिकार्‍याकडे १ महिन्याची सुट्टी मागायला जातो.

अधिकारी : जा, आधी दुश्मनांचा एक रणगाडा घेऊन ये.

दुसर्‍या दिवशी तो जवान खरोखरच एक रणगाडा घेऊन येतो.

अधिकारी : अरे वा, शाब्बास. खूपच शूरवीर दिसतोस. पण हे तु कसं काय केलंस?


जवान : यात कोणती मोठी गोष्ट आहे सर? त्यांना जेव्हा १ महिन्याची सुट्टी हवी असते, तेव्हा ते पण आपल्याकडून रणगाडा घेऊन जातातच की.


मानसिकता


जपानी मानसिकता : जर तो ते करू शकतो, तर मीपण नक्कीच ते करू शकतो. जर ते कुणीच करू शकत नसेल, तर ते मला जरूर केलेच पाहिजे.


भारतीय मानसिकता : जर तो ते करू शकतो, तर त्याला ते करू देत. जर ते कुणीच करू शकत नसेल, तर मी काय जेम्स बॉन्ड आहे का?


30 August 2015

बस्स दोन मिनिटं

एकदा एक भिकारी त्याच्या लहान मुलाला घेऊन सोसायटीत भीक मागायला गेला.

भिकारी : (एका महिलेला) काहीतरी भीक द्या माई. दोन दिवसांपासून उपाशी आहे.

महिला : थांबा हं...दोन मिनिटात आलेच.

आणि ती महिला काहीतरी आणण्यासाठी घरात जाते.

भिकार्‍याचा लहान मुलगा : पप्पा, त्या काकू मॅगी आणायला तर गेल्या नसतील ना?


भिकारी : हो रे बाळा, असू शकतं. भागो...


26 August 2015

कुणाला चरबी आलीय रे...

एकदा यमलोकात यमदेव निवांत बसले होते.

तेवढ्यात दरवाजावर टकटक असा आवाज झाला.

यमदेवांनी दार उघडलं तर एक मनुष्य समोर उभा होता. पण क्षणात तो गायब झाला.

यमदेवांनी दार लावलं आणि पुन्हा निद्रिस्त झाले.

पुन्हा त्यांनी दार उघडलं आणि पुन्हा तो मनुष्य समोर उभा. पण पुन्हा तो क्षणात गायब झाला.

असं ३-४ वेळा घडलं.

मग यमदेव वैतागले आणि तो दिसताच त्यावर जोरात ओरडले, “काय रे, लय चरबी आली का तुला? माझ्याशी पंगा घेतोस?”


मनुष्य : नाही देवा. मी तर पृथ्वीवर वेंटिलेटरवर आहे. ते नालायक डॉक्टर तुमची चेष्टा करतायत.


15 August 2015

बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो


|| बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो ||


हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो



वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो



हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो



करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो



या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो



ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो

|| बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो ||


|| वंदे मातरम, भारतमाता की जय ||



12 August 2015

लाड

पुण्यात भलते लाड चालत नाहीत.

एक मुलगा बाबांना म्हणतो, “बाबा, बाबा, मला ब्लॅकबेरी नाहीतर अॅपल पाहिजे."


बाबा : नालायका, फणस आणलाय तो संपव आधी.


06 August 2015

विठ्ठलाला साकडे



आपल्या महाराष्ट्रात आणि देशात मुबलक पाऊस पडावा आणि शेतकरी जगावा, देशाची भरभराट व्हावी म्हणून एका गावाच्या समस्त गावकर्‍यांनी विठुरायाला साकडं घालायचं ठरवलं.

त्यासाठी गावातील विठुरायाच्या मंदिरातील पुजार्‍याने तयारी केली.

प्रार्थनेचा दिवस उजाडला.

सगळे गावकरी जमा झाले.

प्रार्थना म्हटली गेली.


आणि पुजार्‍याने सर्वांसमोर निवेदन केलं की,”प्रार्थना झालीच पण यातून एक गोष्ट पण समजली की आपला सर्वांचा माऊलींवर किती विश्वास आहे ते...माझ्याशिवाय तुमच्यापैकी कुणीही छत्री घेऊन आला नाही.

बजरंगी भाईजान


जर सलमान खानऐवजी भारतातली काही लोकं मुन्नीला सोडायला पाकिस्तानात गेली असती तर...

१. केजरीवाल गेले असते तर त्यांच्याबरोबर ते ६ कॅमेरामन आणि ४ वार्ताहरांना घेऊन गेले असते शिवाय सीमेवर पाकिस्तानी फौजेसमोर धरणे धरून बसले असते.

२. मोदी गेले असते तर मुन्नीला घेऊन चीन, बांग्लादेश, भुतान, नेपाळ, रशिया, जपान, अफगाणिस्तान आणि मग पाकिस्तानला गेले असते. मग मुन्नी आईकडे पोचल्यावर म्हणाली असती, “मित्रो, मै आ गई|

३.  राहुल गांधी गेले असते तर मुन्नीला म्हणाले असते, “माझ्या हाताची करंगळी पकडून चल नाहीतर हरवशील.”

४. रॉबर्ट वाड्रा गेले असते तर पाकिस्तान पुन्हा एकदा भारताचा भाग झाला असता.


५. अर्णब गोस्वामी गेले असते तर अर्धे पाकिस्तानी मुके आणि अर्धे बहिरे झाले असते.


येडा सरदार

एक सरदार त्याच्या मित्रासाठी झोपेचं औषध घ्यायला डॉक्टरांकडे जातो.

डॉक्टर : एक काम करा. हे घ्या औषध. आता एक पन्नास पैशांचं नाणं घ्या आणि त्यावर मावेल एवढं औषध आज रात्री त्याला द्या.

दुसर्‍या दिवशी सरदार घाबरत घाबरत डॉक्टरकडे आला.

डॉक्टर : काय झालं पाजी?

सरदार : काय सांगू डॉक्टर? रात्री मित्राला औषध दिलं पण त्याने तो कायमचाच झोपला.

डॉक्टर : मी सांगितलं तेवढं औषध नक्की दिलं होतंत ना?


सरदार : हो. फक्त पन्नास पैशांचं नाणं नव्हतं म्हणून मी पाच पैशांच्या नाण्याने त्याला १० वेळा ते दिलं.


प्रामाणिक पुणेकर(ही) असतात बरं का...

पुण्यातील एका देशी दारूच्या दुकानाबाहेर एक बोर्ड लावलेला होता.

“आमच्याइथे दारू पिणारा आयुष्यात हमखास लखपती होतोच होतो. *

*...जर तो आधी करोडपती असेल तर.



सूचना : वरील बोर्ड नीट वाचा, भिकार्‍यासारखे १० वेळा आम्ही कधी लखपती होणार म्हणून विचारायला येऊ नये. अपमान करण्यात येईल.


भागदौड भरी जिंदगी


आम्ही पण लहानपणी श्रीकृष्णासारखे सुंदर होतो,


पण


आयुष्याच्या पळापळीत,



आमचा पार भैरोबा झालाय...


05 August 2015

दोघांचही ऐका, लोकशाही आहे.


केजरीवाल म्हणतात,दिल्ली पोलिसांना आमच्या हाताखाली द्या, कसे सुधारतो त्यांना बघा फक्त.

आणि,


दुसरीकडे, दिल्ली पोलिसांचंपण केजरीवालांबद्दल हेच मत आहे.


मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...