Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

30 August 2015

बस्स दोन मिनिटं

एकदा एक भिकारी त्याच्या लहान मुलाला घेऊन सोसायटीत भीक मागायला गेला.

भिकारी : (एका महिलेला) काहीतरी भीक द्या माई. दोन दिवसांपासून उपाशी आहे.

महिला : थांबा हं...दोन मिनिटात आलेच.

आणि ती महिला काहीतरी आणण्यासाठी घरात जाते.

भिकार्‍याचा लहान मुलगा : पप्पा, त्या काकू मॅगी आणायला तर गेल्या नसतील ना?


भिकारी : हो रे बाळा, असू शकतं. भागो...


26 August 2015

कुणाला चरबी आलीय रे...

एकदा यमलोकात यमदेव निवांत बसले होते.

तेवढ्यात दरवाजावर टकटक असा आवाज झाला.

यमदेवांनी दार उघडलं तर एक मनुष्य समोर उभा होता. पण क्षणात तो गायब झाला.

यमदेवांनी दार लावलं आणि पुन्हा निद्रिस्त झाले.

पुन्हा त्यांनी दार उघडलं आणि पुन्हा तो मनुष्य समोर उभा. पण पुन्हा तो क्षणात गायब झाला.

असं ३-४ वेळा घडलं.

मग यमदेव वैतागले आणि तो दिसताच त्यावर जोरात ओरडले, “काय रे, लय चरबी आली का तुला? माझ्याशी पंगा घेतोस?”


मनुष्य : नाही देवा. मी तर पृथ्वीवर वेंटिलेटरवर आहे. ते नालायक डॉक्टर तुमची चेष्टा करतायत.


15 August 2015

बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो


|| बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो ||


हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो



वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो



हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो



करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो



या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो



ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो

|| बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो ||


|| वंदे मातरम, भारतमाता की जय ||



12 August 2015

लाड

पुण्यात भलते लाड चालत नाहीत.

एक मुलगा बाबांना म्हणतो, “बाबा, बाबा, मला ब्लॅकबेरी नाहीतर अॅपल पाहिजे."


बाबा : नालायका, फणस आणलाय तो संपव आधी.


06 August 2015

विठ्ठलाला साकडे



आपल्या महाराष्ट्रात आणि देशात मुबलक पाऊस पडावा आणि शेतकरी जगावा, देशाची भरभराट व्हावी म्हणून एका गावाच्या समस्त गावकर्‍यांनी विठुरायाला साकडं घालायचं ठरवलं.

त्यासाठी गावातील विठुरायाच्या मंदिरातील पुजार्‍याने तयारी केली.

प्रार्थनेचा दिवस उजाडला.

सगळे गावकरी जमा झाले.

प्रार्थना म्हटली गेली.


आणि पुजार्‍याने सर्वांसमोर निवेदन केलं की,”प्रार्थना झालीच पण यातून एक गोष्ट पण समजली की आपला सर्वांचा माऊलींवर किती विश्वास आहे ते...माझ्याशिवाय तुमच्यापैकी कुणीही छत्री घेऊन आला नाही.

बजरंगी भाईजान


जर सलमान खानऐवजी भारतातली काही लोकं मुन्नीला सोडायला पाकिस्तानात गेली असती तर...

१. केजरीवाल गेले असते तर त्यांच्याबरोबर ते ६ कॅमेरामन आणि ४ वार्ताहरांना घेऊन गेले असते शिवाय सीमेवर पाकिस्तानी फौजेसमोर धरणे धरून बसले असते.

२. मोदी गेले असते तर मुन्नीला घेऊन चीन, बांग्लादेश, भुतान, नेपाळ, रशिया, जपान, अफगाणिस्तान आणि मग पाकिस्तानला गेले असते. मग मुन्नी आईकडे पोचल्यावर म्हणाली असती, “मित्रो, मै आ गई|

३.  राहुल गांधी गेले असते तर मुन्नीला म्हणाले असते, “माझ्या हाताची करंगळी पकडून चल नाहीतर हरवशील.”

४. रॉबर्ट वाड्रा गेले असते तर पाकिस्तान पुन्हा एकदा भारताचा भाग झाला असता.


५. अर्णब गोस्वामी गेले असते तर अर्धे पाकिस्तानी मुके आणि अर्धे बहिरे झाले असते.


मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...